मराठी सुविचार संग्रह

“खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.”

“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”

“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”

“आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”

“अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”

“मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”

“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”

“जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”

“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.”

“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”

“विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.”

“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”

“खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.”

“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”

“खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.”

“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”

“निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”

“शहाण्याला शब्दांचा मार.”

“तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.”

“करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.”

“रिकामे डोके शैतानाचे घर असते.”

“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”

“ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.”

“मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.”

“चकाकते ते सर्व सोन नसते.”

“कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”

“जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.”

“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”

“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”

“कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.”

“वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”

“लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.”

“बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”

“सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.”

“विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”

 “जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”

“अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.”

“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”

“चरित्र हाच खरा इतिहास असतो.”

“नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.”

No comments:

Post a Comment